Sunday, January 16, 2011

विसरण



“विसरण्याचा  छंदच जडलाय  आताशा  मला … विसरत  चाललोय  या  कवितांना …” संदीप  खरेच्या  ह्या  ओळी  मला  वेगळ्या  जगात  घेऊन  जातात . “विसरण्याची  मोठी  छान  देणगी  मिळालीये  आपल्याला ” असं  कोणीतरी  बोलून  गेलं  आणि  मन  एकदम  प्रसन्न   झालं . असं  काहीतरी  ऐकलं  की    बरं  वाटत . मग  परत  मी  त्याचा  कवितेवर  त्याच  ओळीवर  येऊन  अडतो . अगदी  पुढच्याच  ओळीपासून  मी  काय  विसरत  चाललोय  ह्याची  स्पष्ट  आठवण  देऊ  लागतो  तो . मी  काय  विसरत  चाललोय  ह्याची  लख्ख  आठवण . केव्हढा  मोठा  विरोधभास . 


आठवण  (याददाश / memory) ही   जशी  मिळालेली  चांगली  गोष्ट  आहे  तशीच  विसरणं  हे  पण  भारी   आहे . 
पण  मी  आता  वेगळ्याच    चक्रात  अडकत  आहे . कुठल्या  गोष्टी  विसरायच्या , कुठल्या  नाही  विसरायच्या  ह्या  दोन्ही  घोड्यांचा  लगाम  माझ्याच  हातात  आहे  असा  माझा  समज  होता . मला  हवी  ती  गोष्ट  मी   सोडून  देऊ  शकतो  आणि  जी  पाहिजे  ती  न  विसरता  जपून  ठेवू  शकतो  असा  विश्वास  होता  मला . पण  ते  तितकासा  सोप  नाहीये  हे  लक्षात  आल्यावर  जीवाची तग मग     सुरु  झाली . सैरभैर ..इतस्ततः …स्वाभाविक .


' तिच्या  वाढदिवसाला  मी  न  विसरता  message केला  आणि  ती  मात्र   आठवणीने विसरली    …हि  आठवण  मी  विसरू  शकत  नाही .. कितीही  प्रयत्न  केला  तरीही . आणि  लक्षातही  ठेवू  शकत   नाही ..किंवा  लक्षात  ठेवली  आहे  असं  दाखवू  शकत  नाही. '


अश्या  काहीश्या  आठवणी  , ज्या  विसरू  पण  शकत  नाही  ..आठवायची  ताकदही  नसते  आणि  आठवणीत  आहेत  हे  दाखवू  शकत  नाही  ..अशा  आठवणींना  मी  विसरण  म्हणतो ..माझाच  शब्द  मलाच  आवडला.


बादलीभर   पाण्यात  काही  तांदळाचे  दाणे   टाकले  तर ….हवेत  असेस्तोर  जोरात  जातात  आणि  पाण्यात  गेल्यावर  अलगदपणे  प्रवास  करत  तळाशी विसावतात . पाणी  स्वच्छ    असेल  तर  वरून  सहज  दिसतात ..पण  पृष्ठभागावर  मात्र  आपल्या  अस्तित्वाची  जाणीव   न  करू  देता  . पाण्याचा  गुणधर्माचा  आहे  तो .मला  टोचत  राहतात . राणीच्या  कळ्यान सारख्या,  . दिवसरात्र … माझ  मन  मी  स्वतः  साठी  गढूळ  करू  पाहतो ..पण   नाही  जमत.


ह्या  विसरणींचा  मी  खूप   विचार  केला.  खूप  विसरणी  आठवल्या . मनाच्या  तळाशी  निपचित  पडलेल्या . तांदळांच्या  दाण्यासारख्या . मला  मात्र  पूर्ण  जाणीव  होऊ  लागली  होती . मी  नाही  विसरू  शकत …मी  फक्त  आठवू  शकतो  ह्या  विसरणी.


तांदळांच्या  अक्षत  दाण्यान्सकट  पाण्याचा  बर्फ  करून  पाहिला . गोठलेल्या  पाण्यात /बर्फात  पण  पलीकडच  काही  अंशी  दिसत . दुखणाऱ्या  वाहत्या  जखमांवर  खपली  धरायला  लागली  कि  मनाला  बरं  वाटत . पण  खपली  आपल्या अस्तित्वाची जाणीव सतत देत राहते ..आणि  खपली  पडली  तरी  जखमेचा  व्रण  राहतोच . उलट  नेहमीच्या  रंगा  पेक्षा  त्वचा  थोडी  उजळ  दिसू  लागते.


विचार  काही  मनातून  जात  नव्हता  . मी  ह्या  विसरणी  का  आठवू  इच्छित  नाही ? असं  काय  वाईट  आहे  ह्यात ? तिनी  काय  वाईट  केला  माझा ? काय  विरजण  लावला  माझ्या  आनंदाला ? Her’s was the most golden period of my life. ती  आता  माझ्या  बरोबर  नाही  हे  दुख  आहे  का  ती  दुसऱ्या  बरोबर  आहे  ह्याची  टोचणी  बोचत  आहे . कुठला  तरी  काटा  आतच  राहून  खुपत  होता . मी   मलाच  पटवू  पाहत  होतो .
माझ्या  आठवणीतला  सर्वोत्तम  काळ  मी  असं  विसरणीत  टाकू  नाही  इच्छित . मी  तो  काळ  आठवू  इच्छितो . मग  मी  approach बदलला . ह्या  सर्व  आठवणीना  विरजण  लावून  स्थीर  केल . दही  लागल्या  वर  fridge   मध्ये  ठेवून  दिले.


तिच्या  साठी  ठेवलेली  ringtone आता  phone वर  वाजत  तर नाही . पण  ते  गाणे  radio वर  वाजलं  तरी  चेहऱ्या  वर  हलकेच  हसू  येत . प्रसन्न  वाटत  एकदम . Fridge उघडून  दह्याची  चव  घेतल्यासारख  गार  वाटत.


ह्याच  दह्याचा  वापर  मी  पुढच्या  आठवणींना  विरजण  लावून  विसरनींचा   ठेवा  करू  शकतो . इतक्या  प्रगल्भ  झाल्या  आहेत  ह्या  विसरणी  आता . माझ्या  मनाच्या  तळाशी . Fridge   मध्ये . शांत . स्थीर .प्रसन्न .
  

No comments:

Post a Comment