Friday, March 11, 2011

निबंध

शाळेत असताना सर्वात आवडती गोष्ट 'खेळ'. कोणीपण सांगेल.पण त्यानंतरची आवडती गोष्ट विचारलं तर (विचारलं तर न?) निबंध. (may be म्हणूनच हा त्रास होती आता तुम्हाला.) पण असो.
मी बोलतोय ते अगदी तिसरी चौथीतले निबंध.माझी शाळा, माझा भाऊ, माझा कुत्रा, दिवाळी, राखीपोर्णिमा, १५ ऑगस्ट इत्यादि इत्यादि. असले विषय. ठरलेले.

irrespective of school, medium of learning, gender, society of student, his parents... शेवटचे वाक्य fix,
"म्हणून मला माझी शाळा/ माझा भाऊ/ माझा कुत्रा/ दिवाळी/ राखीपोर्णिमा/ १५ ऑगस्ट आवडतात."
yes !  हेच वाक्य. कोणालापण विचारा. हेच ते.


आणि तुमच्या परमभाग्याचा क्षण हा आहे की मी ह्यावर काही टिपण्णी करणार नाहीये..


हा माझा blog आहे. मी इथे काहीही लिहू शकतो. कसंही लिहू शकतो. कधीही लिहू शकतो.
आणि म्हणूनच "मला माझा blog खूप आ व ड तो."

जय हिंद! जय भारत!

( चौथीत १५ ऑगस्ट ला जोडून राखीपोर्णिमा आली होती. सगळ्यांनी १५ ऑगस्ट वरच लिहिले होते. मी मात्र मुद्दामहून राखीपोर्णिमा घेतला होता विषय. निबंध वाचून दाखवण्याची वेळ होती. आणि म्हणून गेलो होतो, "म्हणून मला राखीपोर्णिमा खूप आवडते, जय हिंद!जय भारत!" मग फक्त हशा.)





No comments:

Post a Comment